गोरखपूर : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका पुरुषाने सकाळी त्याच्या प्रेयसीसोबत सकाळी, तर कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी संध्याकाळी लग्न केले. ही घटना ही घटना गोरखपूरच्या हरपूर बुधत भागात घडली. (Double Marriage)
संबंधिताच्या प्रेयसीला दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. पीडितेने सांगितले की, तिचे या पुरूषासोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या दरम्यान तिने दोन गर्भपात केले. दोघांनी मंदिरात लग्नगाठही बांधली होती.
पीडितेने दावा केला की जेव्हा ती पुन्हा गर्भवती राहिली तेव्हा तिला प्रसूतीसाठी एका वृद्धाश्रमात नेण्यात आले. तथापि, त्या पुरूषाने बाळाला तेथील एका परिचारिकेकडे सोपवले. (Double Marriage)
त्या पुरूषाच्या कुटुंबाने त्याचे लग्न आधीच दुसऱ्या महिलेशी ठरवले आहे, हे समजल्यावर या महिलेला धक्का बसला. तिने त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने तिला आपण कोर्ट मॅरेज केले तर त्याच्या कुटुंबाला ते मान्य होईल, आपल्याला नकार देणार नाहीत, असे त्याने सांगितले. तथापि, ज्या दिवशी कोर्ट मॅरेज होणार आहे त्याच दिवशी त्याचे कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी त्याचा विवाह होणार आहे, हे त्या प्रेयसीला माहीत नव्हते. (Double Marriage)
सकाळी, त्याने त्याच्या प्रेयसीशी कोर्टात लग्न केले. नंतर त्याच रात्री, त्याने त्याच्या कुटुंबाने ठरवल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने दुसऱ्या मुलीशी लग्न केले.
लग्नानंतर जेव्हा ही प्रेयसी त्याच्या घरी गेली तेव्हा त्याच्या कुटुंबाने तिचा अपमान केला. तिला घराबाहेर हाकलून लावले, असा आरोप तिने केला.
या घटनेबाबतची तक्रार मिळाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. तसेच संबंधित मुलीने केलेले आरोप खरे असल्याचे आढळल्याचे म्हटले आहे. (Double Marriage)
“आमच्याकडे तक्रार दाखल झाली आहे. त्यासंदर्भात चौकशी केली. मुलीने केलेल्या तक्रारीत तथ्य आहे. योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
असंवेदनशील, अमानवी