नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने मध्यम-पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चार यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. भारतीय लष्करासाठी डीआरडीओ आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज यांनी संयुक्तपणे ही क्षेपणास्रे विकसित केली आहेत. या चाचण्या ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आल्या.(Flight tests)
बहु-कार्यात्मक रडार, कमांड पोस्ट, मोबाइल लाँचर सिस्टम आणि इतर उपकरणांचा यामध्ये समावेश आहे. या आर्मी वेपन सिस्टमने हाय-स्पीड एरियल लक्ष्यांवर चार ऑपरेशनल फ्लाइट चाचण्या घेतल्या.
“या क्षेपणास्त्रांनी थेट मारा करून हवाई लक्ष्यभेद केला. लांब पल्ल्याच्या, कमी पल्ल्याच्या, जास्त आणि कमी उंचीचे चार लक्ष्यभेद या क्षेपणास्रे अचूक भेदली. यामुळे या प्रणालीची कार्यक्षमता सिद्ध झाली,” असे संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.(Flight tests)
या शस्त्र प्रणालीच्या ऑपरेशनल स्थितीत उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीने तैनात केलेल्या रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टमसारख्या रेंज उपकरणांद्वारे कॅप्चर केलेल्या उड्डाण डेटाद्वारे शस्त्र प्रणालीची कार्यक्षमता सत्यापित करण्यात आली.(Flight tests)
“डीआरडीओच्या मार्गदर्शनाखाली पूर्व आणि दक्षिण कमांडकडून भारतीय सैन्याने या चाचण्या केल्या. या चाचण्यांमुळे दोन्ही लष्करी कमांडची ऑपरेशनल क्षमता सिद्ध झाली आहे आणि दोन रेजिमेंटमध्ये शस्त्र प्रणालीच्या ऑपरेशनलीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे,” असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि उद्योगांचे अभिनंदन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “चार यशस्वी चाचण्यांमुळे महत्त्वाच्या रेंजवर लक्ष्य रोखण्याची शस्त्र प्रणालीची क्षमता पुन्हा स्थापित झाली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
Shahu Chatrapati : खासदार शाहू छत्रपतींच्या प्रयत्नातून ६५ कोटींचा निधी मंजूर
कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार शाहू छत्रपतींच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यात नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी आणि रस्त्यांसाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रस्ते, वाहतुक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने प्रशासकीय मंजूर दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. गडहिंग्लज आणि नागनवाडी रस्त्यांला जोडणाऱ्या नदीवरील पुलांसाठी ४० कोटी तर पाचगाव ते बाचणी या रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. (Shahu Chatrapati)
गारगोटी – गडहिंग्लज – नागनवाडी रस्त्यांवरील भडगांवनजीक नवीन पूल उभारण्याची मागणी नागरिकांतून होत होती. पावसाळ्यात महापुराचे पाणी येत असल्याने पुलावर पाणी येते आणि वाहतूक ठप्प होते. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन खासदार शाहू छत्रपती यांनी रस्ते, वाहतुक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली भेट घेऊन त्यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यांनी निधी देण्याचे मान्य केले होते. तसेच आयटीआय – पाचगांव- वडगांव- खेबवडे – बाचणी हा ३० किलोमीटर लांबीचा रस्ता खराब झाल्यामुळे नवीन रस्त्याची मागणी होत होती. खासदार शाहू छत्रपतींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या कामांसाठी निधीचे मागणी करणारे पत्र दिले. त्यांनी दोन्ही विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. (Shahu Chatrapati)
गडहिंग्लज – नागनवाडी रस्त्यावरील मोठ्या पूलाच्या बांधकामास ४० कोटी तर कोल्हापुरातील आयटीआय – पाचगांव- वडगांव- खेबवडे – बाचणी या रस्त्यासाठी २५ कोटी असा ६५ कोटींचा निधी वितरीत करण्याास रस्ते, वाहतुक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने प्रशासकीय मंजूर दिली आहे. (Shahu Chatrapati)
गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या दोन कामांसाठी केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय मार्ग निधीतून ६५ कोटी रुपये मंजूर केल्याने भडगाव जवळील पूलाचा तसेच कोल्हापूर ते बाचणी रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. लवकरच या कामांना सुरवात केली जाणार आहे. (Shahu Chatrapati)
हेही वाचा :
सोल : दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांची शुक्रवारी (४ एप्रिल) गच्छंती करण्यात आली. त्यांच्यावरील महाभियोगाला मान्यता देण्यासाठी संवैधानिक न्यायालयाने एकमताने मतदान केल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे.(Yoon)
मार्शल लॉ लागू करण्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर संसदेने त्यांच्यावर महाभियोग आणला. डिसेंबरमध्ये त्यांना पदावरून निलंबित करण्यात आले होते. (Yoon)
शुक्रवारी निकालाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सोलच्या विविध भागात निकाल थेट पाहण्यासाठी जमलेल्या युन यांच्या टीकाकारांनी प्रचंड जल्लोष केला. यून यांच्या समर्थकांच्या डोळे मात्र डबडबले होते. (Yoon)
युन यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी ३ जूनपर्यंत तत्काळ निवडणूक होणे आवश्यक आहे.
३ डिसेंबरच्या रात्री, जेव्हा युननी सैन्याला संसदेत घुसण्याचा आदेश दिला, तेव्हा दक्षिण कोरियाच्या नागरिकांना धक्का बसला. त्यांच्या या निर्णयामुळे हिंसक, हुकूमशाही समर्थक पुन्हा आक्रमक झाले. त्यामुळे मार्शल लॉ इतिहास संपलेला नाही, अशी लोकांची भावना आहे. आता नवा नेता कोण असेल याची उत्सुकता तेथील जनतेला लागली आहे.
हेही वाचा :
ड्रॅगनचा अमेरिकेवर पलटवार
मोदींनी उपस्थित केला अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा
कोल्हापूर : प्रतिनिधी : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.४ ) झालेल्या सामन्यात यजमान बालगोपाल तालीम मंडळाने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबचा ३-१ अशा फरकाने पराभव केला. दिलबहार तालीम मंडळाने सुभाषनगर फुटबॉल क्लब चा ३- ० अशा गोलफरकाने एकतर्फी विजय मिळवत करत पुढील फेरीत प्रवेश केला. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु आहे. (Chandrakant Cup)
शुक्रवारी सकाळी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम विरुद्ध प्रॅक्टीस क्लब या दोन संघांत सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला. दोन्हीं संघाकडून गोल करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. १३ व्या मिनिटाला बालगोपालकडून झालेल्या चढाईत प्रथमेश जाधव याने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापूर्वी बालगोपालकडून सिंगरे कोम याने गोल करत आघाडी २-० केली. (Chandrakant Cup)
उत्तरार्धातील खेळावर बालगोपालचा आक्रमक पवित्रा कायम ठेवत सुरुवातीलाच ४३ व्या मिनिटाला रोहित कुरणेने गोल नोंदवून संघाला ३ -० असे आघाडीवर नेले. प्रॅक्टिस क्लब कडून झालेल्या चढाईत आकाश बावकर ने ५६ व्या मिनिटाला गोल करत आघाडी १ ने कमी करण्याचा प्रयत्न केला. अखेर बालगोपालने ३ – १ गोलची आघाडी ठेवत सामना जिंकला. बालगोपालकडून आशिष कुरणे, सार्थक जाधव, आदित्य पाटील, सागर पोवार यांनी तर प्रॅक्टीसकडून साहिल डाकवे, ओम घाटगे, यश खोत , साईराज पाटील यांचा चांगला खेळ झाला. (Chandrakant Cup)
दुपारच्या सत्रातील दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यातील सामन्यात सहाव्या मिनिटाला दिलबहार च्या प्रथम भोसलेने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या २० व्या मिनिटाला प्रतीक कांबळेच्या पासवर अजीज मोमीन गोल करत संघाची आघाडी २ – ० केली. फ्रेडी ने ३२ व्या मिनिटाला गोल करत मध्यंतरापर्यंत गोलफलक ३ – ० असा आघाडी वर राहिला. (Chandrakant Cup)
उत्तरार्धात सुभाषनगरने परतफेड करण्यासाठी प्रयत्न केले. दिलबहारच्या चढायाही सुभाषनगरने रोखल्या. दिलबहार कडून रोहन दाभोळकर ,माणिक पाटील सतेज साळोखे यांनी चढाया केल्या . गोलची परतफेड करण्यासाठी सुभाषनगर क्लबकडून जोरदार चढाया केल्या. यात नितीन पोवार,प्रवीण सुतार ,आकाश मोरे सुशील सावंत यांनी आघाडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले पण समन्वयाअभवी गोल करण्यात अपयशी ठरले. अखेर हा सामना दिलबहार ने ३-० अशा फरकाने जिंकला. (Chandrakant Cup)
सामनावीर: प्रथम भोपळे (दिलबहार तालीम), सिंगरे कोम (बालगोपाल तालीम)
शनिवारचे सामने: पाटाकडील तालीम मंडळ ब वि. सम्राट नगर स्पोर्ट्स , सकाळी ८ वा.
संयुक्त जुना बुधवार तालीम वि. झुंझार क्लब , दुपारी ४.००वा.
हेही वाचा :
‘Mangeshkar’ Enquiry: ‘मंगेशकर’मधील गर्भवती मृत्यू प्रकरणाची चौकशी
मुंबई : विशेष प्रतिनिधी : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.(‘Mangeshkar’ Enquiry)
त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही दिले आहेत.
अत्यंत अल्प दरात शासनाकडून भाडेतत्त्वावर भूखंड मिळवून उभारण्यात आलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाने एका गर्भवतीला दाखल करून घेण्यापूर्वी दहा लाख रुपये जमा करण्याच्या सूचना केल्या होत्या. पैसे न भरल्याने त्यांनी तिला दाखल करून घेतले नाही. तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर नातेवाईकाने तिला अन्य रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे रुग्णालयातील प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल सर्व सामान्यतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शुक्रवारी (४ एप्रिल) सर्व पक्षाच्या वतीने रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला. या सर्व प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली.(‘Mangeshkar’ Enquiry)
या प्रकरणाची पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल. समितीत उपसचिव, सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष-मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षक, तसेच विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव समितीचे सदस्य सचिव असतील.
याबाबत दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की, धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा’ची मान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत. विधी व न्याय विभागामार्फत गठीत केलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल आणि समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी.(‘Mangeshkar’ Enquiry)
शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये १८६ धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांवरील भरती तत्काळ करण्यात यावी. निर्धन रुग्णनिधी खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेऊन ती धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी. योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी, असेही या निर्देशांत म्हटले आहे.
हेही वाचा :
ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ ठार
नवी दिल्ली : प्रतिनिधी : चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्र सिंग ढोणी याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. चेन्नईचे फलंदाज प्रशिक्षक मायकेल हसी यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामान्यात नेतृत्व बदलाचे संकेत दिले आहेत. (Chennai Captain)
शनिवारी (दि.५) चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात नेतृत्व बदल होणार असून कर्णधारपदाची धुरा एमएस धोनी यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामान्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या संघातील सहभागाबद्दल शंका निर्माण झाली आहे. तो खेळला नाही तर पर्याय म्हणून घरच्या मैदानावर धोनीला चेन्नईचे कर्णधार म्हणून मैदानात उतरावे लागण्याची शक्यता आहे. (Chennai Captain)
शुक्रवारी फलंदाज प्रशिक्षक मायकेल हसी यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त असून तो बरा झाला आहे का हे आम्ही नेटमध्ये तो फलंदाजी कसा करतो यावर ठरवणार आहोत. जर तो खेळला नाही तर कोण नेतृत्व करेल हे निश्चित नाही. परंतु एका तरुण यष्टीरक्षकाची जागा भरण्याची दाट शक्यता आहे. (Chennai Captain)
तरुण यष्टीरक्षकाच्या उल्लेखामुळे एम.एस धोनी याच्याकडे चेन्नईचे नेतृत्व जाईल अशी अटकळ बांधली जात आहे. यापूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंगचे २२६ सामन्यात नेतृत्व केले आहे. त्याने फ्रँचायझीला पाच आयपीएल आणि दोन चॅम्पियन लिग जेतेपद मिळवून दिले आहेत. या आयपीएल हंगामात चेन्नईने तीन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुध्दच्या सामन्यात चेन्नईचा कस लागणार आहे. (Chennai Captain)
हेही वाचा :
नवी दिल्ली : संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूकर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांनी ही याचिका दाखल केली आहे.(Waqf Bill challenged)
खासदार जावेद वक्फ (सुधारणा) विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे सदस्य होते.
ते म्हणाले की, कायद्यातील तरतुदींमुळे वक्फ मालमत्ता आणि त्यांच्या व्यवस्थापनावर ‘मनमानी निर्बंध’ लादले गेले आहेत. त्यामुळे ‘मुस्लिम समुदायाची धार्मिक स्वायत्तता’ कमी झाली आहे.(Waqf Bill challenged)
“विधेयकातील सुधारणा कलम ३००अ अंतर्गत संरक्षित मालमत्ता अधिकारांवर मर्यादा आणणार आहेत. वक्फ मालमत्तेवर राज्य नियंत्रण वाढवून, धार्मिक हेतूंसाठी मालमत्ता समर्पित करण्याची व्यक्तींच्या क्षमतेवर मर्यादा येणार आहे. वक्फ मालमत्तेची कडक तपासणी होणार आहे. हा कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आहे. धार्मिक मालमत्तेचे नियंत्रण इतर अधिकाऱ्यांना हस्तांतरित करणे हे धार्मिक आणि मालमत्ता अधिकारांचे उल्लंघन आहे,” असे याचिकेत म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की सध्याच्या स्वरूपात असलेले विधेयक संविधानाचे मूलभूत वैशिष्ट्य असलेल्या कलम १४ (समानतेचा अधिकार) चे उल्लंघन करते.(Waqf Bill challenged)
वकील अनस तनवीर यांच्या वतीने श्री जावेद म्हणाले की, त्यात मनमानी वर्गीकरण सुरू केले आहे. त्याचा या कायद्याने साध्य करण्याच्या उद्देशांशी कोणताही वाजवी संबंध नाही.
या निर्बंधांमुळे अलिकडेच इस्लाम स्वीकारलेल्या आणि धार्मिक किंवा धर्मादाय कारणांसाठी आपली मालमत्ता समर्पित करू इच्छिणाऱ्या लोकांविरुद्ध भेदभाव करण्यात आला. ते कलम १५ चे उल्लंघन आहे.
या सुधारणांमुळे सर्वोच्च न्यायालयानेच मान्यता दिलेल्या वक्फ-बाय-युजर या संकल्पनेला वगळण्यात आले, जी दीर्घकालीन धार्मिक वापराद्वारे वक्फचा दर्जा प्राप्त करणारी मालमत्ता आहे.
हेही वाचा :
वक्फ विधेयक मंजुरीनंतर नितीश कुमारांना धक्का
‘वक्फ’ संबंधी काँग्रेसची पुढील रणनीती काय?
नवी दिल्ली : ‘वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेसने शुक्रवारी (४ एप्रिल) भूमिका जाहीर केली. या विधेयकाला पक्षाच्यावतीने लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे पक्षाने म्हटले आहे. (Waqf Amendment bill)
पक्षाचे सरचिटणीस आणि प्रसिद्धी व माध्यम विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी ही भूमिका जाहीर केली. पक्षाने भूतकाळात अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर कायदेशीर आव्हाने दिली आहेत. त्यातील कोणते मुद्दे किंवा विधेयके प्रलंबित आहेत याबद्दल माहिती दिली. तसेच संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या विधेयकालाही न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. (Waqf Amendment bill)
‘‘काँग्रेसने सीएए, २०१९ या कायद्याला आव्हान दिले आहे. त्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आरटीआय कायदा, २००५ मध्ये करण्यात आला. त्यात २०१९ मध्ये सुधारणा करण्यात आला. त्यालाही काँग्रेसने आव्हान दिले आहे. निवडणूक नियम (२०२४) मध्ये केलेल्या सुधारणांच्या वैधतेला काँग्रेसने आव्हान दिले आहे, त्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. धार्मिक पूजास्थळे कायदा, १९९१ च्या कायद्यासंदर्भात काँग्रेसने केलेल्या हस्तक्षेप याचिकेची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे,’’असे त्यांनी म्हटले आहे. (Waqf Amendment bill)
‘‘काँग्रेस लवकरच वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ च्या घटनात्मकतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल,’’ असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारकडून भारतीय संविधानावर विविध मार्गाने जे हल्ले सुरू आहेत, त्या हल्ल्यांना पक्ष पूर्ण ताकदीने विरोध करेल.
अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी विधेयक : खरगे
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, वक्फ बोर्ड (सुधारणा) विधेयक हे सरकारने अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी आणले आहे. ‘एक्स’वर भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘‘वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी आणले गेले आहे, अशी देशवासीयांची भावना आहे. रात्री उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले तेव्हा त्याच्या बाजूने २८८ आणि विरोधात २३२ मते पडली. हे का घडले? याचा अर्थ असा की विधेयकात अनेक त्रुटी आहेत.” (Waqf Amendment bill)
ते म्हणाले, “यावरून आपण अंदाज लावू शकतो की विविध पक्षांच्या विरोधाला न जुमानता, हे विधेयक मनमानी पद्धतीने आणले गेले. हे ‘‘जिस्की लाठी, उस्की भैंस’’ – यातून कुणाचेही भले होणार नाही!’’
CAA, 2019 को लेकर कांग्रेस पार्टी की चुनौती पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई चल रही है।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) April 4, 2025
सूचना का अधिकार अधिनियम, 2005 में सरकार द्वारा वर्ष 2019 में संशोधन किए गए। इन संशोधनों के खिलाफ कांग्रेस पार्टी ने सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाया था। जिसकी सुनवाई सुप्रीम कोर्ट में जारी है।…
Waqf Board Amendment Bill के बारे में देश में ऐसा माहौल बना है कि Minorities को तंग करने के लिए ये बिल लाया गया है।
— Mallikarjun Kharge (@kharge) April 4, 2025
लोकसभा में देर रात ये बिल पास हुआ तो इसके पक्ष 288 और विपक्ष में 232 वोट पड़े। ऐसा क्यों हुआ? इसका मतलब बिल में बहुत खामियां हैं।
इसी से अंदाजा लगा सकते है कि… pic.twitter.com/VXamb3KW35
हेही वाचा :
वक्फ विधेयक मंजुरीनंतर नितीश कुमारांना धक्का
अत्यंत दुर्दैवी
नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याबाबत राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि संसदीय लोकशाहीला कमकुवत करणारे आहे, अशी टिपणी बिर्ला यांनी केली.(LS Speaker slams Sonia)
सोनिया गांधींचे थेट नाव न घेता बिर्ला म्हणाले की, हे विधेयक संपूर्ण संसदीय प्रक्रियेतून मंजूर करण्यात आले. सभागृहात त्यावर १३ तास ५३ मिनिटे चर्चा झाली. त्यात विविध पक्षांच्या ६१ सदस्यांचा समावेश होता. विधेयक मंजूर होण्यापूर्वी ते योग्य त्या प्रक्रियेतून गेले.
“संसदीय कामकाज मंत्र्यांनी माहिती दिली की, या सभागृहाचे सदस्य राहिलेले आणि सध्या दुसऱ्या सभागृहाचे सदस्य असलेले काँग्रेसचे एका ज्येष्ठ नेत्याने दुसऱ्या सभागृहाच्या आवारात बोलताना, वक्फ दुरुस्ती विधेयक सभागृहाने जबरदस्तीने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर सभागृहाने १३ तास ५३ मिनिटे चर्चा केली. यामध्ये विविध पक्षांच्या ६१ सदस्यांनी त्यांचे विचार मांडले,” याकडे लोकसभा अध्यक्षांनी लक्ष वेधले. (LS Speaker slams Sonia)
“एवढी व्यापक चर्चा आणि नियमांनुसार योग्यरित्या मंजूर होऊनही, एका वरिष्ठ नेत्याने सभागृहाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे योग्य नाही आणि संसदीय लोकशाहीच्या प्रतिष्ठेलाही शोभत नाही,” असे ते म्हणाले.
लोकसभेत हे विधेयक “बहुमताच्या जोरावर मंजूर” करण्यात आल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केल्यानंतर सभापतींनी ही प्रतिक्रिया दिली. (LS Speaker slams Sonia)
“हे विधेयक म्हणजे संविधानावरच हल्ला आहे. देशातील जनतेला कायम ध्रुवीकरणाच्या स्थितीत ठेवण्यासाठी भाजपच्या जाणूनबुजून केलेल्या रणनीतीचा हा एक भाग आहे,” असे सोनिया गांधी यांनी म्हटले होते. काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) सर्वसाधारण सभेत पक्षाच्या खासदारांना संबोधित त्या बोलत होत्या.
सरकारने या विधेयकाच्या निमित्ताने पद्धतशीरपणे लोकशाही मूल्यांचे उल्लंघन केले, असा आरोप श्रीमती सोनिया गांधी यांनी केला.
विधेयक अखेर मंजूर
वक्फ विधेयकावर संसदेत घमासान चर्चा झाली. लोकसभा आणि राज्यसभेतही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. विधेयकावरील विरोधकांच्या आक्षेपाला सत्ताधारी सदस्यांनी तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले. सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये बराच खल झाल्यानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी अखेर मंजूर केले.
३१ जानेवारीपासून सुरू झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
हेही वाचा :
मोदींनी उपस्थित केला अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा
ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ ठार
मुंबई : प्रतिनिधी : हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांचे वयाच्या ८७ वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांनी शुक्रवारी (४ एप्रिल) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. डीकंपेंसेटेड लिव्हर सिरोसिस या आजाराने ते बरेच दिवस आजारी होते. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना उपचारासासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी (५ एप्रिल) त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतकुमार नावाने प्रसिद्ध
देशभक्तिपर चित्रपटाची निर्मिती मनोजकुमार यांनी केली होती. त्यांची भारत कुमार नावाने ओळख होती. त्यांनी उपकार, पूरब पश्चिम, क्रांती, रोटी कपडा और मकान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती. सात वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री आणि २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
आबोटाबादमध्ये मनोजकुमार यांचा जन्म
मनोजकुमार यांचे जन्म २४ जुलै १९३७ रोजी अबोटाबाद येथे झाला होता. सध्या हा भाग पाकिस्तानात आहेत. हरक्रिशन गोस्वामी हे त्यांचे मूळ नाव आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, चित्रपट लेखन, गीतकार, एडिटर या सर्व गोष्टीत त्या पारंगत होते. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. त्यांच्या पत्नीचे नाव शशी गोस्वामी असून अभिनेता कुणाल गोस्वामी असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. फाळणीनंतर ते भारतात आले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकातही कामे केली. त्यांचा चेहरा देखणा असल्याने त्यांना चित्रपटात संधी मिळाली. दिलीपकुमार हा त्यांचा आवडता अभिनेता होता. १९५७ मध्ये फॅशन या चित्रपटातून अभिनयास प्रारंभ केला. रेशमी रुमाल, काँच की गुडिया, डॉक्टर विद्या, हरियाली और रास्ता, वो कौन थी, गुमनाम, शहीद, हिमालय की गोद मे, सावन की घटा, दो बदन, पत्थर के सनम हे चित्रपट त्यांचे गाजले. चरित्र अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. शहीद या चित्रपटातील त्यांची क्रांतीवीर भगतसिंग यांची भूमिका चांगलीच गाजली होती.
देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती
उपकार या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटातील ‘मेरे देश के धरती’ हे गाणे खूपच गाजले होते. रोटी कपडा और मकान, क्रांती, पूरब और पश्चिम, पेंटर बाबू, जय हिंद, शोर, क्लर्क या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. क्रांती, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान या चित्रपटांची निर्मिती केली. मनोज कुमार यांना सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळाली होती. १९७३ मध्ये बेईमान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा :